• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

मनोगतांचे शब्दरूप

सेवेची वारी... प्रभात ट्रस्टची आरोग्यदायी साथ!

💊 सेवेची वारी… प्रभात ट्रस्टची आरोग्यदायी साथ! 🙏🚩

श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ, घणसोली यांच्या आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आवश्यक औषधे ह.भ.प. सुनीलजी रानकर महाराज यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर सेवा, समर्पण आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. या सेवाभावी उपक्रमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभात

📚 जुन्या पुस्तकांची कमाल...! 🌱

📚 जुन्या पुस्तकांची कमाल…! 🌱

गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जमा करण्यात आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या पुस्तकांनी आज परिवर्तनाची नवी कहाणी घडवली आहे. “आता थांबायचं नाय” या उपक्रमातून या पुस्तकांनी अनेक वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा दिली.. 🎥 उपक्रमाची दखल :https://www.instagram.com/reel/DYWqWoXj07_/?igsh=czJwMGtqandybzVr पुस्तकांच्या 3R (Reduce, Reuse, Recycle) या संकल्पनेचा प्रभावी अवलंब करत यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिका शाळांकडून इयत्ता नववी व दहावीची

blog-gift-returngift

गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट… ✈️🎁

आपला वाढदिवस फक्त स्वतःच्या आनंदापुरता मर्यादित न ठेवता, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी साजरा करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली… माझे मुळगाव आणि आजोळ — मु.पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली. वडिलांना सहा भाऊ आणि एक बहीण… असा तब्बल ५०+ सदस्यांचा मोठा परिवार. माझ्या आजीने आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास करावा, अशी वडिलांची खूप इच्छा होती. पण ती

Navdurga

? जबाबदाऱ्यांच्या छायेत उजळलेलं शिक्षण ?

तुफानातली 7 वी पणती घरामध्ये एकामागून एक संकटं कोसळली की माणूस खचतो, पण काहीजण मात्र त्या संकटांना सामोरं जात उभं राहण्याची ताकद कमावतात. अशीच आहे आपलीती चार भावंडांतली एक. मोठा भाऊ आणि बहीण लग्न करून स्वतःच्या संसारात रमले. घरी उरली फक्त ती आणि धाकटा भाऊ. वडील सतत आजारी, आई गेल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर

Navdurga

तुफानातली 6 वी पणती..

अर्थात शिक्षणाच्या वाटेवर “आता थांबायचं नाही” म्हणून परतलेली सहावी नवदुर्गा.. वडील मोठ्या आजाराने गेले. आईलाही भयानक आजाराचा साथीदार बनावं लागलं. तीन भावंडांपैकी ती मोठी. आईला सर्वांचा सांभाळ शक्य न झाल्यामुळे दोन्ही मुलांना तिने हॉस्टेलवर पाठवलं. पण तिचं लग्न केवळ १४ व्या वर्षीच लावून दिलं. पती नाका कामगार मिळेल ते काम करून कुटुंब सांभाळतो, आई कचरा

Navdurga

तुफानातल्या पणत्या…५

शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा… तिची चार भावंड दोन भाऊ आणि दोन बहिणी. मोठ्या भावाचे लग्न होऊन तो स्वतंत्र झाला, बहीणही लग्न करून तिच्या संसारात रमली…घरी राहिले ती आणि तिचा माझा धाकटा भाऊ. आईच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. वडील आजारी असल्याने त्यांची सेवा करताना तिचे शिक्षण अपुरेच राहिले. कुटुंबाची

Marathi_Inspirational_Story

वंचितांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे हात – प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट | ओळख | मराठी प्रेरणादायी कथा

मला आठवते आमचे प्राध्यापक लग्नानंतर आम्हाला आशीर्वाद देताना आश्लेषाला सांगत होते प्रशांतच्या सामाजिक कामामध्ये मदत कर… त्यावर ते कसे कमी करायचे हे मी बघतेच असे म्हणणारी आश्लेषा आज प्रभातच्या माध्यमातून सामाजिक कामात माझ्यापेक्षा अधिक अग्रेसर आहे.. तिची मला लाभलेली साथ आपल्याला मुलाखत पाहिल्यास लक्षात येईलच… सर्व सुखदुःखात साथ देणाऱ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

Navdurga

तुफानातल्या पणत्या…४

शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा… दारिद्र्याच्या सावलीत जन्मलेली ती मुलगी. आई–वडिलांचे आयुष्य फक्त कष्ट करून पोटभरण्यापुरतेच मर्यादित. दोन मुली आणि एक मुलगा पण मुलगा मानसिकदृष्ट्या विकलांग. त्यामुळे घरची जबाबदारी मुलींवरच आली. मोठ्या बहिणीचे लग्न लावून दिल्यानंतर घरची सारी जबाबदारी या मुलीवरच कोसळली. लग्नानंतर आयुष्यात थोडे सुख आले दोन गोंडस मुले एक मुलगा,

Navdurga

तुफानातल्या पणत्या…३

शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा… एकविसाव्या शतकात, विज्ञानयुगात जगताना देखील स्त्रीला पती गमावल्यावर आयुष्य संपल्यासारखं वाटतं. आत्मविश्वास, जगण्याची उमेद सगळं हरपून जातं. समाजाची भीती तिच्या पायांना बेड्या घालते. ती 36 वर्षाची असतानाचपती अचानक वयाच्या 45 व्या वर्षीच गेले. दोन मुलं एकाने शिक्षण सोडलं, दुसरा शेवटच्या वर्षाला. घरात दुःख, कर्जाचा डोंगर आणि रोजच्या

Navdurga

तुफानातल्या पणत्या…२

शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा… नवी मुंबईशहराच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तिचा हम दो हमारे दो दोन असा छोटासा संसार.. तीला लहानपणापासूनच विविध कला शिकण्याची आवड होती म्हणून हाताला येईल ती कला आत्मसात करून तिने प्रत्यक्षात उतरवली. तिच्या या जिद्दीमुळे ती एका सामाजिक संस्थेशी जोडली गेली. संस्थेसोबत काम करताना तिला आपल्या कर्तृत्वाची जाणीव होऊ